Monday, November 20, 2006

जोडगाणी

जोडगाणी!
उन्हाळ्यात रात्री फ़िरताना दिवस सुरू व्हायचा. सहज मैल दोन मैल चालणे व्हायचे. गप्पागप्पात विषयही कुठून कुठे भरकटत जायचे. तेवढ्यात एक लकेर सुरावटीसह कानावर येऊन आदळायची. "ना तुम हमे जानो, ना हम तुम्हे जाने, मगर लगता है कुछ ऎसा, मेरा हमदम मिल गया". हेमंतकुमारचा धीरगंभीर आवाज काळजाला छेद देऊन जायचा. त्याचा अवाज विरतो न विरतो तोच, सुमन कल्याणपूर तिच्या मधाळ आवाजात तेच आवाहन पुन्हा करायची. लाटेवर स्वार होवून डुंबायला हवे काय अजून? त्या गाण्याची गोडी संपते न संपते तोच, मुकेश त्याच्या अनुनासिक स्वरात, " रात और दिन दिया जले, मेरे मनमे फ़िरभी अंधियारा है, जाने कहा है वो साथी, तू जो मिले जीवन उजियारा है" आमचे ह्रुदय पिळवटून टाकायचा. त्याचे दु:ख कमी होते की काय असे वाटायला लावणारा स्वर पाठोपाठ यायचा लताचा, तेच सूर घेवून, पण काळजाला ऊभा छेद देवून.
एकाच गीताच्या दोन बाजू फ़ार हुरहूर लवून जातात. त्याच पठडितले हे पहा,"ऎ दिल कहा तेरी मंझिल, ना कोइ दिपक है, ना कोइ तारा, गुम है जमी, गुम आसमा, ऎ दिल कहा तेरी मंझिल!"
यातून वर येतो न येतो तोच "तुम मुझे यू भूला न पाओगे, जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे" वेड लावतं. तीच मजा, " चंदनसा बदन, चंचल चितवन" दोन वेगवेगळ्या आवाजात ऎकताना येते. तोच मुकेश, तीच लता किंवा आशा अथवा सुमन असो, "tandem" उर्फ़ "जोडगाणी" ऎकताना एक वेगळीच नशा चढवून जातात.
पुरूष आणि स्त्री आवाजात तर जोडगाणि आहेतच, पण पुरूष आणि पुरूष ह्यांचीही जोडगाणी आहेत. त्यातले खास गाजलेले म्हणजे, "तुम बिन जाऊ कहा" हे रफ़ी आणि किशोर दोघांनीही समरसून गायलेले. पण तेव्हा यॉडलिंगचा जमाना होता आणि किशोरची नशा होती. बाजी किशोरच मारून गेला यात संशयच नव्हता. रफ़ीचे चाहतेसुध्धा हे तेव्हा कबूल करत होते. त्याहून वेगळे म्हणजे जिवाला चटका लावणारे, अमिताभ आणि लताचे, "नीला आसमा सो गया". सभोवतालचा धूसर निळा परीसर, आठवणीने आर्त झालेले डोळे, बोलका चेहरा, वियोग personified, असे हे चित्र, प्रेमभंगाला पण एका ऊच्च पातळीवर नेऊन ठवतं. नव्हे, आपला पण असा एक तरी प्रेमभंग झाला पाहीजे, ही ईच्छा उफ़ाळून वर येते. किती नशिबवान हे प्रेमभंगाने पोळलेले लोक हेच प्रकर्षाने जाणवते.
"परदेसियोंसे ना अखिया मिलाना", "वादिया मेरा दामन, रासते मेरी बाहे, जाओगे फ़िर कहा, तुम मुझे पाओगे", " जिया हो जिया हो जिया हो कुछ बोल दो", किंवा, "सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था", "जब जब बहार आयी, और फ़ूल मुस्कुराये, मुझे तुम याद आये", "एहसान तेरा होगा मुझपर, दिल चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहोबत हो गयी है मुझे, पलकोंकी छांवमे रहने दो"
ही यादी थांबणारच नाही. एक ह्रुदय कमी पडत होते की काय म्हणून एकाच्वेळेस एका ह्रुदयात दोन जीवांची आग लवून जातात ही गाणी.

1 comment:

Nandan said...

lekh aavadala.

एक ह्रुदय कमी पडत होते की काय म्हणून एकाच्वेळेस एका ह्रुदयात दोन जीवांची आग लवून जातात ही गाणी. -- he vishesh.