Monday, November 20, 2006

जोडगाणी

जोडगाणी!
उन्हाळ्यात रात्री फ़िरताना दिवस सुरू व्हायचा. सहज मैल दोन मैल चालणे व्हायचे. गप्पागप्पात विषयही कुठून कुठे भरकटत जायचे. तेवढ्यात एक लकेर सुरावटीसह कानावर येऊन आदळायची. "ना तुम हमे जानो, ना हम तुम्हे जाने, मगर लगता है कुछ ऎसा, मेरा हमदम मिल गया". हेमंतकुमारचा धीरगंभीर आवाज काळजाला छेद देऊन जायचा. त्याचा अवाज विरतो न विरतो तोच, सुमन कल्याणपूर तिच्या मधाळ आवाजात तेच आवाहन पुन्हा करायची. लाटेवर स्वार होवून डुंबायला हवे काय अजून? त्या गाण्याची गोडी संपते न संपते तोच, मुकेश त्याच्या अनुनासिक स्वरात, " रात और दिन दिया जले, मेरे मनमे फ़िरभी अंधियारा है, जाने कहा है वो साथी, तू जो मिले जीवन उजियारा है" आमचे ह्रुदय पिळवटून टाकायचा. त्याचे दु:ख कमी होते की काय असे वाटायला लावणारा स्वर पाठोपाठ यायचा लताचा, तेच सूर घेवून, पण काळजाला ऊभा छेद देवून.
एकाच गीताच्या दोन बाजू फ़ार हुरहूर लवून जातात. त्याच पठडितले हे पहा,"ऎ दिल कहा तेरी मंझिल, ना कोइ दिपक है, ना कोइ तारा, गुम है जमी, गुम आसमा, ऎ दिल कहा तेरी मंझिल!"
यातून वर येतो न येतो तोच "तुम मुझे यू भूला न पाओगे, जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे" वेड लावतं. तीच मजा, " चंदनसा बदन, चंचल चितवन" दोन वेगवेगळ्या आवाजात ऎकताना येते. तोच मुकेश, तीच लता किंवा आशा अथवा सुमन असो, "tandem" उर्फ़ "जोडगाणी" ऎकताना एक वेगळीच नशा चढवून जातात.
पुरूष आणि स्त्री आवाजात तर जोडगाणि आहेतच, पण पुरूष आणि पुरूष ह्यांचीही जोडगाणी आहेत. त्यातले खास गाजलेले म्हणजे, "तुम बिन जाऊ कहा" हे रफ़ी आणि किशोर दोघांनीही समरसून गायलेले. पण तेव्हा यॉडलिंगचा जमाना होता आणि किशोरची नशा होती. बाजी किशोरच मारून गेला यात संशयच नव्हता. रफ़ीचे चाहतेसुध्धा हे तेव्हा कबूल करत होते. त्याहून वेगळे म्हणजे जिवाला चटका लावणारे, अमिताभ आणि लताचे, "नीला आसमा सो गया". सभोवतालचा धूसर निळा परीसर, आठवणीने आर्त झालेले डोळे, बोलका चेहरा, वियोग personified, असे हे चित्र, प्रेमभंगाला पण एका ऊच्च पातळीवर नेऊन ठवतं. नव्हे, आपला पण असा एक तरी प्रेमभंग झाला पाहीजे, ही ईच्छा उफ़ाळून वर येते. किती नशिबवान हे प्रेमभंगाने पोळलेले लोक हेच प्रकर्षाने जाणवते.
"परदेसियोंसे ना अखिया मिलाना", "वादिया मेरा दामन, रासते मेरी बाहे, जाओगे फ़िर कहा, तुम मुझे पाओगे", " जिया हो जिया हो जिया हो कुछ बोल दो", किंवा, "सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था", "जब जब बहार आयी, और फ़ूल मुस्कुराये, मुझे तुम याद आये", "एहसान तेरा होगा मुझपर, दिल चाहता है वो कहने दो मुझे, तुमसे मोहोबत हो गयी है मुझे, पलकोंकी छांवमे रहने दो"
ही यादी थांबणारच नाही. एक ह्रुदय कमी पडत होते की काय म्हणून एकाच्वेळेस एका ह्रुदयात दोन जीवांची आग लवून जातात ही गाणी.

Thursday, November 09, 2006

गॉसिप - सूरत स्टाईल

तुमच्या वेळेस गॉसिपींग कसं काय चालायचं.
कसं काय म्हणजे? धूम चालायचं.
दाखवा
कि मग एक झलक.
एक कशाला, भरपूर देइन. पण म्हणतात ना, नदीच मूळ, ऋषीचं कूळ, तसंच, नटीचं खूळ शोधू नये.
सुरूवात करो या, अमिताभपासून. हा जो पहिल्यांदा जयाला एका पार्टीत भेटला तेव्हा याची girl-friend होती, तेव्हाची ५ फ़ूट ७ ईंच स्लीम शीला जोन्स! जया तेव्हा नुकतीच, फ़िल्म FTII च्या भास्कर चौधरीला (तिचा instructor) प्रेमाचं नाटक करून, चकवून आली होती.
FTII वरून आठवलं, शबाना तेव्हा FTII च्याच class-mate बेंजामिन गिलानीबरोबरची engagement तोडून अंकुर साईन करायला शिकली होती. शबाना आली तर मागून स्मिता पाटीलही येणारच. तमाम IIT च्या जनतेबरोबर, गौतम राजाध्यक्ष्सुध्धा सामिल होता. मराठी येत नसतानासुध्धा IITतली जनता तेव्हा मुंबई दूरदर्शेनवरील मराठी बातम्या "बघायची".
अमिताभने एका सिनेमात व्हीलनचा रोल केला होता परवाना त्यात हीरो होता "नवीन निश्चल". दुसऱ्यात हीरो होता जीतेंद्र. याच जीतेंद्रने शोभा सिप्पीबरोबर steady असताना हेमा मालिनी बरोबर लग्नं करण्याचा घाट घातला होता. तो लगेच शोभाने धर्मेंद्रची मदत घेवून हाणून पाडला. धर्मेंद्र त्याआधी लीना चंदावरकर बरोबर गळाडूब प्रेमात होता, तर हेमा संजीववर फ़िदा होती. पण हेमाच्या आईने संजीवकुमारला डांसरबरोबर पकडल्याने, तो हेमाच्या मनातून उतरला.
शबाना कमर्शियल सिनेमात येण्यासाठी शशी कपूरबरोबर प्रेमाचे नाटक खेळतेय हे कळल्यावर, जेनीफ़रने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ईकडे रेखाने एकामागोमाग एक बॅचलर पळ्वायला सुरूवात केली होती, विनोद मेहरा, किरणकुमार, वगैरे वगैरे. तर, श्रीदेवीने मध्येच मिथुनबरोबर चोरटे लग्नं करून नंतर ते मोडले पण. मिथुन ममता शंकर बरोबर लग्न करता करता राहिला. पण त्याने हेलेना बरोबर लग्न करून मोडले त्यानंतर. ईकडे मजहर खानने नंदिनी सेन बरोबर लग्न करून पुन्हा मोकळा झाला. पुढे त्याच मजहरने झीनत अमान बरोबर लग्न केले त्याआधी तिने संजय खान बरोबर चोरून लग्न केले होते. संजय खान म्हणजे रितीकचा सासरा.
हीच झीनत एकदा राजेश खन्नाबरोबर खोट्या प्रेमाच्या शपथा घेताना डिंपलने ऎकले होते. तीच डिंपल, जी एके काळी महाराष्त्राच्या मुख्यमंत्र्याच्या मुलाबरोबर dating करत होती, तर राजेश अंजू महेंद्रू बरोबर रहात होता. तीच अंजू जी वेस्ट ईंडिजच्या सोबर्सवर भाळली होती.
जावू दे. सध्ध्या पहीला अध्याय येथेच समाप्तं करतोय.